International Research journal of Management Sociology & Humanities
( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
भारतीय राज्यघटनेत स्त्रीयांचे स्थान
1 Author(s): DR. VARSHA GAIKWAD
Vol - 9, Issue- 9 , Page(s) : 225 - 230 (2018 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
भारतीय राज्यघटना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीली व 26 नोव्हेंबर 1949 रोजी डाॅ. राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती (भारत सरकार) यांच्या सुपुर्द केली. भारतीय राज्यघटना समितीच्या स्थापनेनंतर राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस चालली. या समितीत एकूण 299 सदस्यांपैकी 15 स्त्री सदस्या होत्या. ज्यांनी भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेत अनेक विषयांवर काथ्याकुट करून सांगोपांग चर्चा केली व निर्भीडपणे या विषयावर मते मांडली. या स्त्री सदस्यांच्या विचारमंथनात अद्याप फारसे विचारमंथन झालेले दिसत नाही. 71 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने या स्त्रीयांनी कोणती भरीव कामगिरी केली ? याविषयी महत्वाची चर्चा होणे गरजेचे आहे.